
उत्पन्नामध्ये वाढ होऊन उत्पन्न २.५ लाख होणे, चारचाकी वाहन, आंतरराज्य विवाह, सरकारी नोकरी, आधार कार्ड आणि बँक पासबुकवरील नावामध्ये फरक असेल तर अशा महिला पात्र ठरणार नाहीत. मात्र अडीच लाखांहून कमी उत्पन्न असलेल्या महिलांना लाभ पुढेही मिळत राहील. मात्र ज्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती कर भरत असेल, ज्या महिला सरकारी नोकरीला आहेत, अथवा ज्यांना पेन्शन मिळत आहेत. अशा महिला देखील योजनेसाठी पात्र नाहीत. असं आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.




