
सतेज पाटील म्हणाले की, जी फोडाफोडी सत्ता स्थापन करताना झाली होती तीच फोडाफोडी कोल्हापूरमध्ये झाली आहे. स्वत:च्या ताकदीवर जिंकण्याची खात्री नसल्यानेच जयश्री जाधव यांना पक्षात घेतलं आहे. या पक्षप्रवेशासाठी मुंबईला घेऊन गेले, असा टोला पाटील यांनी क्षीरसागर यांना लगावला. जयश्री ताईना खासगी विमानाने मुंबईला नेण्यात आले. त्यांच्यावर काही दबाव होता की, काय हे जयश्री जाधव सांगू शकतील. मात्र, कोल्हापूर जिल्ह्याती जनता हे सहन करणार नाही.