
संजय राऊत यांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईबद्दल बोलताना ते म्हणाले, “खोट्या प्रकरणात मला गोवण्यात आले, आम्ही राजकीय सुडाचे बळी ठरलो. नवीन सरकार बनत असताना संजय राऊत बाहेर राहता कामा नये, त्याला आत टाका असे आदेश दिल्लीवरुन आले होते. २४ तासात मला एका खोट्या केसमध्ये गोवण्यात आले. ईडीचे अधिकारी सकाळी ७ वाजता आले, सगळीकडे धाडी पडल्या, मी जिथे राहतो तो संपूर्ण परिसर सील केला जणूकाही ते कसाबलाच पकडायला आले आहेत.”








