
अर्थात ज्यांना ‘महाराष्ट्र शाहीर’ म्हणून गौरवलं गेलं, त्यांच्याबद्दल आजच्या पिढीला फारशी माहिती नाही आणि शासनानेही त्यांची दखल घेतलेली नाही, अशी खंत केदार शिंदे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या पोस्टवर आता चाहत्यांनी देखील कमेंट केली आहे. एका चाहत्याने लिहिले की, ‘अलौकिक प्रतिभेचे धनी, आजच्या आमच्या पिढीतल्या लोकांना त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. पण, हा चित्रपट पाहून त्यांच्या अफाट कर्तृत्वाची जाणीव झाली. हा चित्रपट काढलात त्यासाठी केदार सर तुम्हालाही धन्यवाद!.







