
सोशल मीडियाविषयी बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले की, ‘सोशल मीडिया हे असे ठिकाण आहे की, जिथे लोकांशी संपर्क होतो, दोन चांगल्या गोष्टी घडतात, कधी वाईट गोष्टीही ऐकून घ्याव्या लागतात. आयुष्यात चांगल्या गोष्टीही असतात आणि वाईटही असतात. जर तुम्हाला कुणी म्हणत असेल की हे काम करू नका, तुमच्याने होणार नाही, तर त्याचे आव्हान स्वीकारा आणि ती गोष्ट घडवून दाखवा.’







