
यानंतर कंगना रनौत हिने नंतर त्याच कोर्टात जावेद अख्तर यांच्या विरोधात ‘खंडणी आणि गुन्हेगारी धमकी’ या प्रकरणी उलट तक्रार दाखल केली. कंगना रनौतने तिच्या तक्रारीत दावा केला होता की, सह-कलाकाराशी तिच्या वादानंतर, जावेद अख्तर यांनी तिला आणि तिच्या बहिणीला म्हणजेच रंगोली चंडेल यांना चुकीच्या हेतूने आपल्या घरी बोलावले होते आणि नंतर त्यांना धमकावले.’ या प्रकरणात महानगर दंडाधिकारी आरएम शेख यांनी २४ जुलै रोजी जावेद अख्तर यांना समन्स बजावले होते. या प्रकरणात कोर्टाने जावेद अख्तर यांच्यावरील खंडणीचे आरोप फेटाळले.







