
काय म्हणाली जुई गडकरी?
गेले कित्येक दिवसांपासून सायली आणि अर्जुन ही सत्याची लढाई अतिशय जिगरीने लढत आहेत. जुई गडकरीने नुकतीच शेअर केलेली पोस्ट देखील याच संदर्भात असल्याचे म्हटले जात आहे. जुईने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, ‘तुम्ही सगळे ज्या गोष्टीची वाट बघत होतात, ती गोष्ट आता लवकरच घडणार आहे. सत्याचाच विजय होणार! #ठरलं तर मग बघत रहा.’ तिच्या या पोस्टमुळे आता मालिकेत पुढे काय घडू शकतं, याची कल्पना चाहत्यांना आली आहे.








