
जयंत पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घडामोडीबाबत भाष्य केलं. जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीत शरद पवार यांची बाजू मजबूत आहे. यात शंका घेण्यासारखं काहीच नाही. पक्ष पक्षाच्या ठिकाणी आहे. आमदार गेले म्हणून पक्ष त्यांच्या पाठीमागून जात नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या बाबतीत सुनावणीदरम्यान स्पष्ट केलं आहे. देशातील पदाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्रे दिली आहेत, त्यामध्ये शरद पवार यांनाच अध्यक्ष म्हणून मान्यता दिली आहे.



