
Jalgaon Rain Updates : गेल्या आठवड्याभरापासून होत असलेल्या मुसळधार पावसाने उत्तर महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. जळगाव, नाशिक, धुळे आणि अहमदनगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. तसेच धरणांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. परंतु आता मध्यप्रदेशातील सुकी धरण ओव्हरफ्लो झाल्याने नागझिरी, मात्रान आणि रसलपूर नदीला पूर आला आहे. त्यामुळं आतापर्यंत पुरात अडकलेल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच पुरामुळं २० जनावरं देखील दगावली आहे. त्यामुळं आता मान्सूनच्या पहिल्याच पावसात जळगावात नद्यांना पूर आल्याने बळीराजाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.







