
त्यांचे १-२ खल्लास करू तेव्हाच शांत बसू –
मृत मुकेशचे चुलते निळकंठ शिरसाठ यांनी सांगितले की,आमच्या मुलाने त्यांच्या मुलीसोबत पळून जाऊन लग्न केले होते. तेव्हापासून मुलासोबत त्यांचे जुने वैर होते. आमच्या संपूर्ण कुटूंबाला ते दुश्मन मानत होते व मुकेशला जीवे मारण्यासाठी संधीची वाट बघत होते. त्यांना माहिती होते की, रविवार असल्याने मुलगा घरी असतो. यांच्यासोबत आपण काहीतरी करू. त्यामुळे त्यांनी नियोजन करून त्याच्यावर हल्ला केला व त्याला संपवले. हल्लेखोरांनी कोयते,लोखंडी रॉड, चॉपरआणि तलवारीने हल्ला केला. अनेक लोकांना घरावर विटा देखील फेकल्या. जवळपास २५ ते ३० लोकांना आमच्या घरावर हल्ला केला. त्यांना वाटत असेल की,त्यांनी आमच्या पोराला मारले आहे. त्यांचे देखील आम्ही एक-दोन खल्लास करू,तरच आम्ही राहू. या बदला घेण्याच्या विड्याने परिसरातील तणाव वाढला आहे.