
कसा आहे कलाकारांचा अभिनय?
या चित्रपटात सगळेच मातब्बर कलाकार आहेत. करीना कपूर हिने या चित्रपटात खूप चांगला अभिनय केला आहे. मात्र, तिच्या भूमिकेला आणखी खुलवता आले असते. या चित्रपटाचे कथानक हे करीना साकारत असलेल्या ‘माया’च्या पात्राभोवती फिरणारे आहे. करीनाला स्वतःला एका नव्या भूमिकेत सादर करण्याची ही उत्तम संधी होती. मात्र, करीनाला विशेष काही करता आलेले नाही. मात्र, ती तिच्या भूमिकेत लक्षात राहते. तर, दुसरीकडे विजय वर्मा देखील फारसा या पात्रात शिरलेला दिसला नाही. विजय आणि करीनाची जोडी पडद्यावर काही अंशी फोल ठरली आहे. मात्र, या सगळ्यात प्रेक्षकांच्या लक्षात राहतो तो अभिनेता जयदीप अहलावत. या चित्रपटात दमदार अभिनय करून जयदीपने पुन्हा एकदा त्याचं कसब सिद्ध केलं आहे.








