
निवडणूक आयोगाने नुकताच आगामी लोकसभा निवडणूक आणि ४ राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यावेळी निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी आगामी निवडणुकीत गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलले जातील, असा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने देशातील निवडणुका निष्पक्ष पार पडाव्यात, यासाठी गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या ६ राज्यांतील गृहसचिवांना हटवण्याचे आदेश जारी केले. यासोबतच मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागातील सचिव आणि पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालकांना पदावरून हटवण्याचे आदेश दिले.




