
दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करण्यात भारतीय रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावते. प्रवासा दरम्यान प्रवासी अनेकदा अवजड सामान घेऊन जातात. मात्र, प्रवाशांची सोय आणि सुरक्षितता लक्षात घेऊन रेल्वेने सामान वाहून नेण्याची मर्यादा निश्चित केली आहे. ही मर्यादा ओलांडल्यास प्रवाशाला दंडही भरावा लागू शकतो.