
हल्लीच्या ट्रॅफिकच्या वेळी रोडने प्रवास करणे अनेक लोकं टाळतात. अशावेळी अगदी लोकल सेवा, रेल्वे फायदेशीर ठरते. अनेक कलाकारही आपला ट्रॅफिकमधील वेळ वाचवण्यासाठी रेल्वेने देखील प्रवास करतात. पण तुम्हाला माहित आहे का, जर रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी तुमचं ट्रेनचं तिकिट फाटलं किंवा हरवलं तर काय कराल? अशावेळी तुम्हाला जास्तीचा दंड भरावा लागतो का?
अनेकवेळा असे घडते की, ट्रेनमधून प्रवास करताना अनेकदा तिकिट फाटतं किंवा आपण विसरतो. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वेचे काय नियम आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रवासी ट्रेनमध्ये प्रवास करू शकत नाहीत की त्यांना दंड भरावा लागेल? चला, भारतीय रेल्वेच्या नियमांबद्दल जाणून घेऊया.
प्रवासादरम्यान तुमचे ट्रेनचे तिकीट हरवले असेल किंवा फाटले असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. डुप्लिकेट तिकीट बनवून तुम्ही प्रवास करू शकता. प्रत्येक श्रेणीसाठी डुप्लिकेट तिकिटांसाठी स्वतंत्र शुल्क आहे. TTE वर जाऊन तुम्ही बनवलेले डुप्लिकेट तिकीट मिळवू शकता. याशिवाय तुम्ही रेल्वे स्टेशनवरून बनवलेले डुप्लिकेट तिकीटही मिळवू शकता.
डुप्लिकेट तिकीट शुल्क
भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटनुसार (indianrail.gov.in), प्रवाशाला डुप्लिकेट तिकिटासाठी शुल्क भरावे लागते. ही फी ट्रेनच्या क्लासवर अवलंबून असते. द्वितीय आणि स्लीपर क्लाससाठी 50 रुपये शुल्क भरावे लागेल. त्याच वेळी, त्यावरील श्रेणीसाठी, 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तुमचे कन्फर्म केलेले तिकीट हरवल्यास, तुम्हाला डुप्लिकेट तिकिटासह 50% भाडे द्यावे लागेल.
(हे पण वाचा – ट्रेनच्या डब्यावर असलेल्या 5 डिजिट नंबरचा अर्थ काय? याला डिकोड करण्याची बेस्ट टीप)
त्याच वेळी, जर तुम्हाला तुमचे मूळ तिकीट मिळाले, तर तुम्ही ट्रेन सुटण्यापूर्वी रेल्वे स्टेशनच्या काउंटरवर जाऊन डुप्लिकेट तिकिटासाठी भरलेले पैसे मिळवू शकता.
तिकीट फाटले तर काय होईल?
एखाद्या प्रवाशाचे ट्रेनचे तिकीट फाटले तर त्यालाही डुप्लिकेट तिकीट काढावे लागते. यासाठी प्रवाशाला 25 टक्के भाडे द्यावे लागणार आहे. तुमचं वेटिंग तिकीट फाटलं तर तुम्हाला डुप्लिकेट तिकीट मिळू शकत नाही.








