
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, अचानक जोरदार बर्फवृष्टीमुळे नाथुला पास येथे ५०० हून अधिक पर्यटकांना घेऊन जाणारी सुमारे १७५ वाहने अडकून पडले. या ठिकाणी उणे शून्य तापमान होते. जर या पर्यटकांना वेळेवर मदत मिळाली नसती तर त्यांच्या जिवावर बेतले असते. मात्र, ‘त्रिशक्ती कॉर्प्सचे जवान शून्य तापमानात घटनास्थळी पोहोचले आणि अडकलेल्या पर्यटकांची सुटका केली. त्यांना तत्काळ औषध, गरम अन्न आणि सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली. हिमालयातील देशाच्या सीमेचे रक्षण करणारी त्रिशक्ती कॉर्प्स पर्यटक आणि सामान्य जनतेला सहकार्य करण्यासाठी नेहमीच सक्रिय असते, असेही यावेळी सांगण्यात आले.