
जयशंकर म्हणाले, “हे बंदर अद्याप विकसित झालेले नाही. जोपर्यंत १० वर्षांपर्यंतचा करार होत नाही, तोपर्यंत बंदरात गुंतवणूक करणे अवघड आहे. त्यामुळे चाबहारचा बंदराच्या ज्या भागात गुंतवणूक केली जाणार आहे, जो भाग आता या करारामुळे लवकरच विकसित केला जाणार आहे. या बंदरामुळे पोर्ट कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. “आमचा विश्वास आहे की आज त्या भागात कनेक्टिव्हिटी ही मोठी समस्या आहे. चाबहार आपल्याला मध्य आशियाशी जोडेल, असे ते म्हणाले.







