
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दिमाखदार विजयाने विरोधकांच्या INDIAआघाडीत बिघाडी निर्माण केली आहे. आघाडीची ६ डिसेंबर रोजी काँग्रेसच्या नेतृत्वात बैठक बोलावण्यात आली आहे. मात्र या बैठकीत उपस्थित राहण्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी नकार दिला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, हा पराभव जनतेचा नाही तर काँग्रेसचा आहे. काँग्रेसची रणनीती योग्य नव्हती. काँग्रेसने जागा वाटपाबाबत बोलणी केली नाही, याचा परिणाम दारुण पराभवात झाला. त्यांनी म्हटले की, इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. यानंतर चर्चा केल्या जात आहेत की, कदाचित ममता बनर्जी मीटिंगमध्ये उपस्थित राहणार नाहीत.








