Independence Day: कवी प्रदीप यांना समुद्र किनाऱ्यावर फिरताना सुचलेल्या ओळी! ‘ए मेरे वतन के लोगो’चा किस्सा ऐकलात?

0
18
Independence Day: कवी प्रदीप यांना समुद्र किनाऱ्यावर फिरताना सुचलेल्या ओळी! ‘ए मेरे वतन के लोगो’चा किस्सा ऐकलात?


कवी प्रदीप यांना जेव्हा हे देशभक्तीपर गाणे लिहिण्याची जबाबदारी देण्यात आली, तेव्हा ते याबाबत खूपच गंभीर होते. काय लिहावे यावर त्यांनी खूप विचार केला. एके दिवशी ते समुद्रकिनारी फेर फटका मारत असताना, उधाणलेल्या समुद्राच्या लाटा पाहत होते. तेवढ्यात त्यांच्या मनात काही ओळी आल्या. आणि क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी त्या ओळी कागदावर उतरवण्याचा विचार केला. मात्र, नेमका त्यावेळी त्यांच्याजवळ कागद नव्हता. मात्र, त्यांवेली त्यांच्या खिशात सिगारेटचे पाकीट होते. त्यांनी ते पाकीट काढले आणि या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी त्यांनी सिगारेटच्या पाकिटात असलेल्या कागदावर लिहून ठेवल्या. त्यानंतर या गाण्याने कसा इतिहास रचला, हे आज प्रत्येकालाच माहित आहे.



Source link