
येत्या दोन दिवसांत भारताच्या पूर्वेकडील आणि द्वीपकल्पीय भागांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
गेल्या काही दिवसापासून देशात काही ठिकाणी सुर्य आग ओकताना दिसत आहे तर काही ठिकाणी अवेळी वरुणराजानं हजेरी लावलेली दिसत आहे. या अशा वातावरणाचा नागरिकांना मोठ फटका बसत असून आता येत्या दोन दिवसांत देशात तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा (IMD Alert) देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत भारताच्या पूर्वेकडील आणि द्वीपकल्पीय भागांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागेल, तर 9 एप्रिलपर्यंत ईशान्य भागात जोरदार पावसासह वादळाचा हवामान खात्यानं असा इशारा दिला आहे.
हे सुद्धा वाचा
भारतीय हवामान विभाग (IMD) ने सांगितले की, 9 एप्रिलपर्यंत ईशान्येकडील भागात जोरदार पाऊस आणि वादळ येऊ शकते. ओडिशा, गंगेच्या पश्चिम बंगाल, झारखंड, विदर्भ, उत्तर अंतर्गत कर्नाटक, किनारी आंध्र प्रदेश आणि यानम, रायलसीमा आणि तेलंगणा या भागात दोन दिवस उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे.