
Heat Wave Lok Sabha Election : दिवसेंदिवस उष्णतेचा कहर वाढतच चालला आहे. देशभरात उष्माघातामुळे आतापर्यंत 54 जणांचा मृत्यू झाला आहे. तर बिहारमध्ये उष्णतेमुळे निवडणूक ड्युटीवर असणाऱ्या 18 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आज शेवटच्या टप्प्यातील 57 जागांसाठी आज मतदान होत आहे. याचदरम्यान उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मतदानासाठी ड्युटीवर असलेल्या 18 कर्मचाऱ्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. देशभरात उष्णतेमुळे आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये उष्णतेमुळे 32 जणांना जीव गमवावा लागला आहे. त्याचवेळी ओडिशातही उष्णतेमुळे १० जणांना जीव गमवावा लागला आहे.
उष्णतेमुळे 18 कर्मचाऱ्यांचा मृत्यू










