
लंजे यांच्या शेतातून विद्युत विभागाचे ३३ एल. टी. ची लाईन गेली आहे. पाऊस व वाऱ्याने सदर लाईनची तार मागील आठवड्यापासून तुटून पडली आहे. याची तक्रार काही शेतकऱ्यांनी विद्युत विभागाला दिली होती. मात्र, विद्युत विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज शेतकरी दाम्पत्याला आपले जीव गमवावे लागले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता स्थानिकांनी केली आहे.




