Goa Temple Stampede:50 हजार भाविक, जळतं अंगारे अन्…गोव्यातील लैराई देवी यात्रेची परंपरा?चेंगराचेंगरी कशी झाली?

0
31
Goa Temple Stampede:50 हजार भाविक, जळतं अंगारे अन्…गोव्यातील लैराई देवी यात्रेची परंपरा?चेंगराचेंगरी कशी झाली?


Goa Temple Stampede : गोव्यात शिरगाव येथील लेराई देवी मंदिरात धार्मिक यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू झाला तर 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे देशात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत स्वतः रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधान मोदींपर्यंत सर्वांनाच या घटनेने दुःख व्यक्त केलं. आता प्रश्न असा आहे की लैराई देवी मंदिरात नेमकं घडलं काय? काय आहे या मंदिरातील यात्रेची परंपरा?

चेंगराचेंगरी कशी झाली?

आता प्रश्न असा आहे की चेंगराचेंगरी का झाली? प्रत्यक्षात, लैराई देवी जत्रेत सुमारे 40 ते 50 हजार भाविक सहभागी झाले होते. मंदिर परिसरात एवढी मोठी गर्दी जमेल यावर कोणाचाही विश्वास नव्हता. बराच वेळ गर्दी नियंत्रित करण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र लोकांची गर्दी काही केल्या पांगली नाही. काही वेळातच गोंधळ उडाला आणि गर्दीचे चेंगराचेंगरीत रूपांतर झाले. यानंतर, सर्वजण एकमेकांवर कोसळून जीव वाचवण्यासाठी पळू लागले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, गर्दीतील काही जणांचे नियंत्रण सुटल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. स्थानिक आणि मंदिराचे स्वयंसेवक लोकांना वाचवण्यासाठी धावले. (Goa Temple Stampede what is lairai devi jatra traditional ritual festival)

मंदिरात काय आहे यात्रेची परंपरा!

खरंतर, गोव्यातील लेराई देवी मंदिरात हजारो भाविक शतकानुशतके जुन्या विधी पाहण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी येत असतात. इथे ‘धोंड’ जळत्या अंगाऱ्यावर अनवाणी चालतात. दरवर्षी उत्तर गोव्यात श्री लेराई यात्रा भरते, ज्यामध्ये 50,000 हून अधिक भाविक येतात. यावेळीही 50 हजार भाविक आले होते. धार्मिक यात्रेच्या एका ठिकाणी उतार असल्याने गर्दी वेगाने एकत्र पुढे जाऊ लागल्याने चेंगराचेंगरी झाली. यानंतर सर्वत्र आरडाओरडा आणि आरडाओरडा सुरू झाला.

पारंपारिक धोंडाची जत्रा यासाठी हजारोंच्या संख्येने लोक यात्रेत सहभागी होता. धोंडाची जत्रा हे यात्रेतील प्रमुख आकर्षण आहे. गोव्यातील ही देवीच्या यात्रेतील पारंपरिक प्रथा आहे. लैराई देवीची जत्रा ही केवळ धार्मिक प्रथा नसून ही गोव्याची संस्कृती असून राज्यातील आध्यात्मिकतेचा भाग आहे. लैराई देवी ही देवी पार्वतीचं रुप मानलं जातं. अनेक भक्त या यात्रेत जळत्या निखाऱ्यांवर विना चप्पल चालतात. विना चप्पल चालत ते देवीला मान देत असल्याचं बोललं जातं.

किती पोलीस तैनात होते?

चेंगराचेंगरी होताच मंदिर प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने कारवाई केली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या विधीसाठी 1000 पोलीस तैनात करण्यात आले होते. गर्दीच्या हालचालींवर हवाई देखरेख ठेवण्यासाठी ड्रोन देखील तैनात करण्यात आले होते. असे असूनही, चेंगराचेंगरी ही दुर्घटना घडली. 





Source link