Gharoghari Matichya Chuli 24 June: हृषिकेश आणि जानकीच्या वट पौर्णिमेत ऐश्वर्या विघ्न आणण्यात सफल होणार?

0
23
Gharoghari Matichya Chuli 24 June: हृषिकेश आणि जानकीच्या वट पौर्णिमेत ऐश्वर्या विघ्न आणण्यात सफल होणार?


ऐश्वर्या खाणार माती!

हृषिकेश दादा प्रमाणेच सारंग देखील ऐश्वर्यासाठी व्रत करणार आहे. तर, मी सगळं जानकी वहिनीसारखं करणार, असं ऐश्वर्याने म्हटलं आहे. मात्र, जानकीचा वट पौर्णिमेचा उपास हा अतिशय कडक असतो. ती काहीच खात नाही आणि पाणीही पीत नाही, असे सगळेच ऐश्वर्याला सांगतात. मात्र, तरीही ऐश्वर्या जानकीची जागा मिळवण्यासाठी हा प्रयत्न करते. परंतु, तिला तिची भूक आवरता येत नाही. खाण्याच्या शोधात असलेली ऐश्वर्या आता घरात शोधाशोध करू लागणार आहे. त्यावेळी तिला एका टोपलीत फळं दिसणार आहेत. भुकेलेली ऐश्वर्या ती फळं उचलून खाऊ लागणार आहे. मात्र, ही फळं शोभेची म्हणजेच मातीची असल्याने आता जानकी ऐश्वर्याला सुनावणार आहे.



Source link