
नानांनी दोन लग्न केली होती आणि हृषिकेश हा त्यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे, हे सत्य आता ऐश्वर्याला कळलं आहे. याच सत्याचा फायदा घेऊन ऐश्वर्या आता नवा डाव रचणार आहे. या प्लॅननुसार, ऐश्वर्या नाना आणि त्यांच्या पहिल्या पत्नीचा फोटो काहीही करून जानकीच्या किंवा घरातील कोणाच्याही समोर आला पाहिजे, याचा प्रयत्न करणार आहे आणि तिच्या या प्रयत्नाला देखील यश देखील मिळणार आहे. हिम्मतराव घरी नानांना भेटायला आले असताना, ऐश्वर्या त्यांच्यासाठी लिंबू पाणी घेऊन येणार आहे. या हे लिंबू पाण्यात ऐश्वर्या औषध मिसळून आणणार आहे.








