
घोटाळ्याचा आकडा वाढत जाईल!
‘घरातील लाइट किंवा पंखा चालू करण्यासाठी बटण दाबलं की अदानींच्या खिशात पैसे जातात. हे सगळं कोण करवतंय? अदानींचं रक्षण कोण करतंय? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. भारत सरकारनं अदानींना ब्लँक चेक दिलाय. ते हवं ते करू शकतात. इलेक्ट्रिसिटी, शेती, पोर्ट, एअरपोर्ट जे काही अदानींनी पाहिजे, ते घेऊ शकतात. कुठलीही चौकशी होत नाही. आतापर्यंत आम्ही ३२ हजार कोटींचा घोटाळा दाखवून दिलाय. हा आकडा आणखी वाढत जाईल, असा दावा राहुल गांधी यांनी केला.








