
शाहरुख पुढे म्हणाला, ‘पण बंगला विकत घेऊनही नंतरचा खर्च आमच्या आवाक्याबाहेर होता. घर खरेदी करणे ही वेगळी बाब आहे. पण ते नीटनीटकं ठेवणं आणि सुव्यवस्था राखणं यासाठी आणखी पैशांची आवश्यकता होती. त्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते. आम्ही काही डिझायनरला फोन केले, पण त्यांनी सांगितलेला खर्चाचा आकडा आम्हाला परवडत नव्हता. त्याकाळी आमच्याकडे इतके पैसे नव्हते. मग मी गौरीची मदत घेतली. मी गौरीला म्हणालो की, तुझ्यात कलात्मकता आहे, मग तू डिझायनर का होत नाहीस? अशा प्रकारे मन्नतच्या डिझायनिंगला सुरुवात झाली. आम्ही जे काही पैसे कमावले ते ‘मन्नत’साठी वस्तू विकत घेण्यात खर्च केले. इथूनच गौरीच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली.’






