
रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथील समुद्रात तीन जण बुडाले होते, यातील दोन जणांचा मृत्यू झाला असून एकाला वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये जेएसडब्ल्यू कंपनीच्या पोर्टवरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आज सुट्टी असलेल्याने कंपनीचे तीन कर्मचारी समुद्रात पोहण्यासाठी गेले होते. त्यातील दोघांचा बुडून मृत्यू झाला तर एकाला वाचविण्यात यश आले. ही घटना रविवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.