
2. तंत्रज्ञान विध्वंसक नव्हे तर सर्जनशील बनवावे, असे आवाहन पंतप्रधानांनी जागतिक नेत्यांना केले. आगामी काळ ‘हरित युग’ करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, असे मोदी म्हणाले.
3. लोकसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आल्यानंतर जी-7 शिखर परिषदेला उपस्थित राहणे ही माझ्यासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे, असे मोदी म्हणाले.
4. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) क्षेत्रात भारताच्या पुढाकाराचे कौतुक करताना मोदी म्हणाले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये राष्ट्रीय धोरण तयार करणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये भारताचा समावेश आहे.
5. गेल्या वर्षी भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी-२० परिषदेचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, ‘गेल्या वर्षी भारताने आयोजित केलेल्या जी-२० शिखर परिषदेत आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय प्रशासनाच्या महत्त्वावर भर दिला होता.







