
पोलिसांनी सांगितले की, ट्रक तामिळनाडूमधून आली होती. यामधून आणलेले फटाके गोदामामध्ये उतरले जात होता. त्यावेळी अचानक आग लागली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाने अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत किती लोक अडकले आहेत, याची निश्चित माहिती मिळालेली नाही. गोदामात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.






