
याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जगदीश खेबुडकर यांनी अष्टविनायकांपैकी एकही गणपती प्रत्यक्षात पाहिला नव्हता. त्यामुळे गणपतीचा महिमा लिहावा तरी कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यावेळी शरद यांनी त्यांच्या हातात एक अष्टविनायक गणपतींची सगळी माहिती असणारे एक पुस्तक टेकवले. ते वाचून अवघ्या एका रात्रीत जगदीश खेबुडकरांनी गणपती बाप्पाचा महिमा अक्षरशः तिथे जाऊन वर्णन करावा, अशाप्रकारे कागदावर उतरवला. इतकंच नाही तर, दुसऱ्या दिवशीच त्यांनी स्वतःच्याच आवाजात हे गाणे रेकॉर्ड केले. आजही हे गाणे तुफान लोकप्रिय आहे.






