
अभिनेत्री रंजना देशमुख यांनी आपल्या दमदार अभिनयाने अनेक कलाकारांना मागे टाकले होते. त्यांनी अनेक बड्या अभिनेत्रींना टक्कर दिली होती. रंजना यांनी कमी वयातच मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. व्ही. शांताराम यांच्या ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ या १९६५मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ‘बिनकामाचा नवरा’, ‘सासू वरचढ जावई’, ‘सुशीला’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘असला नवरा नको ग बाई’,’गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ अशा एकापेक्षा एक चित्रपटातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.








