
नवी दिल्ली : भाजपला जोरदार आव्हान देण्यासाठी देशातील सर्व विरोधीपक्षांनी उभारलेल्या इंडिया अलायन्सला चांगलेच भगदाड पडले आहे. पहिल्यांदा नितीश कुमार यांनी इंडिया अलायन्सपासून दूर गेल्यानंतर पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि ‘आप’चे केजरीवाल यांनी ‘एकला चलो’चा नारा दिला होता. आता पुन्हा एकदा इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे सर्वोसर्वा फारुख अब्दुल्ला यांनी ‘एकला चलो’चा नारा दिला आहे.
फारुख अब्दुल्ला यांचा ‘एकला चलो’चा नारा









