
Farmers Protest March Towards Delhi : शंभू बॉर्डरवरून दिल्लीकडे निघालेल्या १०१ शेतकऱ्यांच्या तुकडीला हरियाणा पोलिसांनी रोखले आहे. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये वाद झाला. पोलिसांनी शेतकऱ्यांना परवानगीशिवाय दिल्लीला जाता येणार नसल्याचे सांगितले. हे शेतकरी शस्त्र घेऊन आले होते, असा आरोप पोलिसांनी केला आहे. यानंतर शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. यावर हरयाणा पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे सोडले, ज्यामुळे गोंधळ उडाला. बीकेयूचे रेशम सिंह अश्रुधुराच्या गोळ्याने जखमी झाले आहेत. अशा तऱ्हेने पोलिसांनी पुन्हा अश्रुधुराचे गोळे सोडले आणि शेतकऱ्यांना माघार घेण्यास भाग पाडले. शंभू सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे.







