
Fact Check News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मोहन भागवत काँग्रेसचं कौतुक करताना दिसत आहेत. व्हिडिओत मोहन भागवत बोलतात की, आपल्या देशातील लोकांमध्ये राजकीय बुद्धिमत्ता कमी आहे, सत्ता कोणाकडे आहे, याचे महत्त्व त्यांना कमी माहिती आहे, आपण आपल्या देशातील लोकांमध्ये राजकीय जागृती केली पाहिजे, म्हणून संपूर्ण देशात काँग्रेसच्या रूपाने एक मोठी चळवळ उभी राहिली.” यासोबतच भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचे मोठे योगदान असल्याचे ते म्हणतात.








