
विरोधकांनी ईव्हीएमवर प्रश्न चिन्ह –
उपस्थित केले ‘मिड डे’च्या वृत्ताचा हवाला देत विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी भारताच्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, भारतातील ईव्हीएम हा एक ब्लॅक बॉक्स आहे, ज्याची छाननी करण्याची कोणालाही परवानगी नाही. जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो, तेव्हा लोकशाही ढोंग बनते आणि फसवणुकीला बळी पडते,’ असे त्यांनी ‘एक्स’वर लिहिले आहे.







