
लोकसभेचे बिगूल वाजलेले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी आता कंबर कसली आहे. प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. त्यातच विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएम शंका व्यक्त करीत मतपत्रिकांवर निवडणूक घेण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे ईव्हीएम संदर्भात केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला निर्देश देण्यात आले.
नवी दिल्ली : लोकसभेचे बिगूल वाजलेले आणि देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. त्यातच विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएम शंका व्यक्त करीत मतपत्रिकांवर निवडणूक घेण्याची मागणी होऊ लागली आहे. पण याला निवडणूक आयोगानं विरोध दर्शवला आहे. त्याचबरोबर आता मतदानात पारदर्शकता राहावी यासाठी ईव्हीएमला जोडलेल्या व्हीव्हीपॅट मशिनमधील पावत्यांची शंभर टक्के मोजणी करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
Supreme Court Issues Notice To ECI On Plea For 100% EVM Votes-VVPAT Verification#SupremeCourtOfIndia #SupremeCourt #ECI #VVPAT https://t.co/3alc6yPSdI
— Live Law (@LiveLawIndia) April 1, 2024










