
खर्गे म्हणाले की, ओबीसी, एससी, एसटी आणि दुर्बल घटकांनी पूर्ण ताकदीनिशी जी मते दिली आहेत ती वाया जात आहेत. आमची मागणी आहे की, सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात. ईव्हीएम मशीन त्यांना आपल्या घरात ठेवू द्या. अहमदाबादमध्ये बरीच गोदामे आहेत, त्यामध्ये नेऊन यंत्रे ठेवावीत. आमची एकच मागणी आहे की, निवडणुका बॅलेट पेपरद्वारे व्हाव्यात. तसे केले तर या लोकांना कळेल की ते किती पाण्यात आहेत.