
लोकसभा निकाल जाहीर झालीवर अनेकदा दोन उमेदवारांना समान मते मिळाली आहे. या दृष्टीने विजयी कोण होणार याची घोषणा करण्याच्या दृष्टीने कायदा तयार करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियमच्या कलम १०२ नुसार, दोन उमेदवारांना मिळालेल्या मतांची संख्या सारखी राहिली तर लॉटरी किंवा टॉसच्या माध्यमातून विजेत्याच्या नावाची घोषणा होते. या अधिनियमानुसार, लॉटरी जिंकणाऱ्याला विजेता घोषित करण्यात येते. कारण त्याला एक अतिरिक्त मत प्राप्त झाले असे घोषित केले जाते. या वर्षी हिमाचल प्रदेशात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी व भाजपचे हर्ष महाजन यांना मिळालेल्या मतांची संख्या समान होती. लकी ड्रॉ अर्थात ड्रॉ ऑफ लॉट्स नियमानुसार भाजपच्या हर्ष महाजन यांना विजयी घोषित करण्यात आले होते.







