
लोकसभा निवडणुकीवेळी तुतारी आणि पिपाणी चिन्हामुळे लोकसभेला मोठा गोंधळ झाला होता. पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवारांनी हजारो मते घेतल्याने याचा फटका शरद पवार गटाला बसला होता. यानंतर शरद पवार गटाने याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करत पिपाणी चिन्ह गोठवण्यात यावं, अशी मागणी केली होती. यासंदर्भात निवडणूक आयोग काय निर्णय घेणार आहे?या प्रश्नावर निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.