
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, “आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडून दिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा दावाही शिंदे यांनी केला. ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, जे माझ्या घराच्या गेटबाहेर गेले नाहीत ते आता शेतकऱ्यांना भेटत आहेत, याचा आनंद आहे. शिंदे पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत मतदार महाविकास आघाडी) आणि महायुती केलेल्या कामांची तुलना करतील. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने २१ पैकी ९ जागा जिंकल्या होत्या.”





