
लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक निष्ठावंत मतदार मतदानादरम्यान सुट्टीवर गेले होते, त्यामुळे महायुतीला राज्यात मोठा फटका बसल्याचा तर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावला आहे. शिंदे म्हणाले की, लोकसभेच्या ५४३ सदस्यांच्या कनिष्ठ सभागृहात भाजपला ४०० हून अधिक जागा मिळतील, असे मतदारांनी गृहीत धरले होते, त्यामुळे ते मतदानालाच गेले नाहीत.







