दरम्यान, दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांनी सोमवारी दिल्ली जल बोर्डाच्या अधिकाऱ्यांसमवेत वजीराबाद जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. हरयाणा सरकारने यमुना नदीत पाणी सोडले नाही, त्यामुळे दिल्लीत पाणीटंचाई निर्माण झाली आहे, असा आरोप त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.







