
नएचएआयने केलेल्या अभ्यासात दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाढत्या अपघातांचे प्रमुख कारण समोर आले आहे. अनेक वाहनचालक निर्धारित वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवत असल्याचं निदर्शनास आलं आहे.
तुम्हीही दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस (Delhi Mumbai Expressway) वेवरून प्रवास करत असाल तर आता तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. कारण तुमच्या गाडीने वेग मर्यादा ओलांडली तर आता वाहनचालकांवर कारवाई होणार आहे. मुंबई द्रुतगती मार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी NHAI ने आता वाहनांचा वेग शोधण्याच्या यंत्रणेद्वारे अशा चालकांची ओळख पटवण्याचा निर्णय घेतला आहे. हरियाणा पोलिसांशी माहिती शेअर केली जाईल. त्यानंतर त्या वाहनचालकांवर कारवाई केली जाईल.
हे सुद्धा वाचा








