
सोशल मीडियातही वातावरण तापलं!
पत्रकार ऋतुपर्णा चॅटर्जी यांच्यासह अनेस सोशल मीडिया युजर्सनी दिल्लीतील उष्णतेच्या लाटेबद्दल भाष्य केलं आहे. एनसीआरमध्ये नेमकं काय घडतंय आणि इथं किती उष्णता आहे, हे इतर ठिकाणच्या लोकांना पूर्णपणं समजलं आहे, असं मला वाटत नाही. सकाळी ७ वाजता नळाचं पाणी उकळलेलं असतं. उन्हामुळे डोळ्याला त्रास होतो. दिवस आणि रात्रीमध्ये फरकच राहिलेला नाही. २४ तास तापमान ४० सेल्सिअसच्यावर जाणवतं. रात्रीच्या वेळीही पाणी तितकंच गरम असतं,’ असं त्यांनी एक्सवर लिहिलं आहे.








