
दरम्यान, या वादळामुळे तब्बल १४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या वादळचा सर्वाधिक फटका हा चेन्नई, आंध्र प्रदेशातील काही जिल्ह्यांना बसला आहे. झाडे आणि वीज कोसळल्याने १४ नागरी ठार झाले आहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडूमध्ये २, आंध्र प्रदेशमध्ये ३, चेन्नईमध्ये ९ नागरिकांचा या वादळामुळे बळी गेला आहे. तर तामिळनाडू राज्यातील नऊ जिल्ह्यांतील ६१ हजार नगगरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, आज या वादामुळे लंगणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच दक्षिण छत्तीसगड, दक्षिण किनारपट्टी आणि ओडिशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.








