
आरोपी प्रकाश चुंचवाड आणि कामाक्षी यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, कामाक्षीने प्रकाश सोबत ब्रेकअप केले. या घटनेचा राग प्रकाशला आला. त्याने तिला ठार मारण्याचे ठरवले. दरम्यान, प्रकाश हा तिला शेवटच्या भेटण्याच्या उद्देशाने तिच्या फ्लॅटवर गेला. यावेळी प्रकाशने कुठलाही विचार न करता सोबत नेलेल्या चाकूने कामाक्षीच्या गळ्यावर तब्बल ३५ वर केले. यात कामाक्षीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन त्याने जमिनीत पुरला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. प्रकरणाचा तपास सुरू केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.






