
होळी सणाच्या अवघ्या काही तासांपूर्वीच राजस्थानच्या दोन जिल्ह्यात गुंडांनी रक्तरंजित होळी खेळली. यामध्ये सात जणांची हत्या करण्यात आली. एका जिल्ह्यात पाच तर दुसऱ्या जिल्ह्यात दोन हत्या झाल्या आहेत.
जयपूर : होळी सणाच्या अवघ्या काही तासांपूर्वीच राजस्थानच्या दोन जिल्ह्यात गुंडांनी रक्तरंजित होळी खेळली. यामध्ये सात जणांची हत्या करण्यात आली. एका जिल्ह्यात पाच तर दुसऱ्या जिल्ह्यात दोन हत्या झाल्या आहेत. पाच हत्येनंतर मृतदेहांची अवस्था पाहून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
झालावाड जिल्ह्यातून पाच हत्या झाल्याची माहिती येत असून, उदयपूर जिल्ह्यात आणखी दोन हत्या झाल्या आहेत. उदयपूर जिल्ह्यात रात्री उशिरा खुनाच्या दोन घटना घडल्या. या घटनांमध्ये दोन खुनांशिवाय आणखी दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.










