
राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, राजसमंद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुदर्शन सिंह रावत यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. परदेश दौच्यावरून परतल्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेण्याची घोषणा केली.
जयपूर : राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, राजसमंद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुदर्शन सिंह रावत यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. परदेश दौच्यावरून परतल्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेण्याची घोषणा केली.
रावत यांनी त्यांच्या जागी अन्य कोणाला तरी उमेदवारी द्यावी, अशी विनंती पक्षाकडे केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पक्षासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, या जागेसाठी उमेदवार शोधण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे.










