
राज्य सरकारने प्रस्तावित ‘भारत जोडो न्याय यात्रा’ १४ जानेवारीपासून मर्यादित संख्येने सहभागी होऊन सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, काँग्रेसने ही परवानगी फेटाळली होती. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून, १४ जानेवारीला यात्रेला मर्यादित संख्येने सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे,” असे इंफाळ पूर्व जिल्ह्याच्या जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले होते. यात्रेत सहभागी होणाऱ्या व्यक्तींचे नावे, क्रमांक व इतर माहिती ही आधीच पोलिसांना उपलब्ध करून द्यावी जेणेकरून हे कार्यालय सर्व आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करू शकेल, असे काँग्रेसला देण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.








