
एकनाथ शिंदे म्हणाले की, हे महाराष्ट्र आहे, ही मुंबई आहे, येथे कुठलीही गँग नाही. मुंबईतील संपूर्ण अंडरवर्ल्ड संपलं आहे. आम्ही बिश्नोईला खतम करु. अशी हिंमत कोणीही करणार नाही. येथे मुंबई पोलीस आहेत. येथे कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही. कोणत्याही नागरिकाला जर कुणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर खपवून घेतलं जाणार नाही. सलमान खान तर खूप मोठा फिल्मस्टार आहे. त्याच्या कुटुंबाची जाबाबदारी आमची आहे. अशी कुणाचीही गँग इथे चालणार नाही. त्यांची गँग आम्ही मुंबई महाराष्ट्रात चालू देणार नाही. ज्यांना पकडलंय त्यांचा तपास सुरु आहे. मूळापर्यंत तपास होईल. जो जो आरोपी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.





